महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शंकरराव चव्हाण--
(कार्यकाल 21 फेब्रुवारी 1975 ते 16 एप्रिल 1977 आणि 14 मार्च 1986 ते 24 जून 1988)
माननीय वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दी नंतर महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री म्हणून माननीय शंकराव चव्हाण यांनी 21 फेब्रुवारी 1975 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शंकराव चव्हाण यांच्या रूपाने पहिल्यांदा मराठवाड्याला मुख्यमंत्री पद मिळाले शंकरराव चव्हाण हे 1975 ते 1977 आणि 1986 ते 1988 असे दोन वेळा मुख्यमंत्री झाले त्यांचा एकूण मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल हा चार ते साडेचार वर्षाचा भरतो १९५२ ते २००२ ह्या पन्नास वर्षात ते सतत सत्तेमध्ये राहिले हे त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये मानावे लागते.
राजकीय वाटचाल-
माननीय शंकराव चव्हाण यांनी हैदराबाद स्वातंत्र्यलढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांच्याबरोबर काम केले होते त्यामुळे स्वामीजींच्या राजकीय सामाजिक विचारांचा प्रभाव शंकराव चव्हाण यांच्यावर पडला होता स्वामीजींनी त्यांना हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या सचिव पदी नेमले त्यानंतर 1949 रोजी ते नांदेड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बनले आणि या क्षणापासून त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली त्यांनी सचिव पदापासून सुरुवात करून पुढे महाराष्ट्र व केंद्र शासनातील विविध सन्मानाची पदे भूषविले.
लढविलेल्या निवडणुका आणि भूषविलेली पदे--
हैदराबाद स्टेट काँग्रेसचे सचिव त्यानंतर 1949 मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेस समितीचे सरचिटणीस 1952 स*** पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत हादगाव या विधानसभा मतदारसंघातून पराभूत १९५३ मध्ये नांदेड नगरपालिकेच्या निवडणुकीत विजय होऊन नगराध्यक्षपदी निवड 1956 मध्ये भाषिक मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळात महसूल खात्यांचे उपमंत्री म्हणून नियुक्ती १९५७ च्या निवडणुकीत धर्माबाद विधानसभा मतदारसंघातून विजयी एक मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे व वीज मंत्र म्हणून काम पाहिले 1962 मध्ये धर्माबाद विधानसभा मतदारसंघातून विजयी 1967 मध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातून विजय प्राप्त केला 1972 मध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातून विजयी 2 फेब्रुवारी 1975 रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान 1978 मध्ये शरद पवारांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम पाहिले १९८० मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले 1980 च्या लोकसभा निवडणुकीत विजय झाल्यानंतर केंद्रीय मंत्री मंडळात शिक्षण आणि पुरातत्त्व विभागाचा त्यांनी कार्यभार सांभाळा 1986 मध्ये दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली 1988 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री पदी त्यांची नेमणूक झाली पीव्ही नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळा शेवटी ते राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त झाले. शंकरराव चव्हाण यांनी 1952 ते 2002 या पन्नास वर्षाच्या काळात २० पेक्षा जास्त खात्यांचा कार्यभार सांभाळा तिथे प्रशासकीय शिस्त लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे त्यांची कारकीर्द विशेष महत्त्वाची ठरते.
त्यांनी घेतलेले निर्णय व केलेली अंमलबजावणी पुढील प्रमाणे--
माननीय शंकराव चव्हाण मुख्यमंत्री होण्याअगोदर मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि केंद्रीय मंत्रिमंडळात विविध खात्यांच्या पदावर कार्यभार सांभाळत असताना त्यांनी घेतलेले निर्णय आखलेली धोरणे आणि त्यांची केलेली अंमलबजावणी यांचा अभ्यास एकत्रितपणे खालील प्रमाणे करता येतो विद्युत निर्मितीत वाढ करण्यासाठी कोराडी येथील औष्णिक केंद्राचे दुसरी युनिट सुरू केले मंत्रांनी दहा वाजता मंत्रालयात हजर राहावे जनतेने मंत्रांना भेटण्यासाठी दुपारी दोन मंत्री हवे असा निर्णय त्यांनी घेतला पूर्वीच्या सचिवालय या शब्दाचे मंत्रालय असे नाव नामकरण त्यांनी केले स्थापन करण्याचा निर्णय घेतला जायकवाडी विष्णुपुरी ईसापुर उजनी या धरणा केलीस भीमा नदी व पैनगंगा नदीवरील धरणांची योजना त्यांनी राबवली शेतकऱ्यावरील 50 कोटींची कर्ज त्यांनी माफ केले फायलींचे गट्टे घरी नेण्याच्या प्रथेला आळा घातला आदिवासींना फसवून त्यांच्या जमिनीवर कब्जा करणाऱ्या सावकारांच्या हातून त्या जमिनीत परत मिळून दिल्या भिकारी हटाव मोहिमेद्वारे वाढत्या भिकाऱ्यांच्या संख्येला आळा घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला मादक पदार्थांचे वापरावर त्यांनी बंदी घातली मराठवाडा ग्रामीण बँकेची त्यांनी स्थापना केली जवाहर रोजगार हमी योजनेबरोबर ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रमाचा त्यांनी समावेश केला अशा या महान व्यक्तीस कोटी कोटी अभिवादन व मानाचा मुजरा....
Post a Comment